प्रस्तावना
भगवान बुध्दांना बोधीवृक्षाखाली अतिशय चिंतन मनन करुन ज्ञान प्राप्ती झाली व ते सम्यक सम्बुद्ध झाले . वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या ज्ञानांचे त्यांनी प्रथम धम्म देसना पञ्चवग्गिय भिक्खुसमोर सारनाथ येथे दिली. हेच प्रथम धम्मचक्क पवत्तन होय.
त्यांना चार आर्य सत्ये, प्रतीत्यसमुत्पाद व आर्य अष्टांगिक मार्ग इ. चा शोध लागला म्हणजेच ज्ञान प्राप्त झाले. त्याचे त्यांनी चिंतन मनन केले. तेथेच बसुन (बोधीवृक्षाखाली ) त्यांनी सात आठवडे विमुक्ती सुखाचा आनंद घेतला.
तथागत बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये चार आर्य सत्याचे महत्वपूर्ण स्थान आहे .
ही चार आर्य सत्ये पुढीलप्रमाणे :-
(१) जगात दु:ख आहे – हे प्रथम आर्य सत्य
जगात सर्वत्र आढळणाऱ्या दु:खाला महासतिपट्ठान सुत्तात सागींतले आहे. जन्म दु:ख आहे, वार्धक्य दु:ख आहे. प्रिय व्यक्ती चा वियोग, अप्रियांचा संग हे दु:ख आहे. इच्छा पूर्ती न होणे, हे पण दु:ख आहे. संक्षेपाने पञ्च उपादान स्कंध हे दु:ख आहे. मानवी जीवनातील या दु:खाची विभागणी तिन भागांत केली आहे…
(१) दु:ख दु:खता
(२) संस्कार दु:खता
(३) विपरीणाम दु:खता
* दु:ख दु:खता—
हे सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक दु:ख होय.
*संस्कार दु:खता—
हे आपल्या वरील संस्कारामुळे उदभवणारे दु:ख होय. देवदत्त सुत्तात भगवान बुध्दानी उदाहरण दिले आहे की , सुंदर प्रेयसीने पर पुरुषाशी हंसुन बोलणे , वागणे हे आपल्या संस्काराप्रमाणे क्लेष व दु:खकारक ठरते
*विपरीणाम दु:खता—
अपयशामुळे, निराशेमुळे उदभवणारे दु:ख होय.
अशाप्रकारे जगतातील दु:खा बद्दल भगवान बुध्द सांगतात .
(२) दु:ख समुदय- हे दुसरे आर्य सत्य
जगातील दु:खाच्या निर्मितीला कारण आहे. दु:खाचे मुळ असणे याला कारण आहे. ते कारण म्हणजे तृष्णा होय बुध्द महासतिपट्ठान सुत्तात म्हणतात –
पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ व विकारयुक्त असलेली ,अनेक विषयात रमणारी ही तृष्णा होय.
ही तिन प्रकारची असते-
(१)काम तृष्णा
(२) भव तृष्णा
(३)विभव तृष्णा
*काम तृष्णा:-
यांत लैगिंक सुखाबरोबर षडयंत्राद्वारे इंद्रीय सुख प्राप्त करण्याची प्रबळ उर्मी येते.ती शमन न होता उत्तरोउत्तर वाढत जाते व अधिक दु:खाचे कारण बनते.
*भव तृष्णा :-
ही लोभातुन उद्भवते. भौतिक वस्तुंचा अधिकाधिक संग्रह व प्रसिद्धी वर्चस्व मधुन भव तृष्णा उद्भवत असते
*विभव तृष्णा:-
ही इतर तृष्णा पेक्षा मोठी असते. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची लालसा असणे, अलाभ,भय, इच्छा माणसात निराशा, न्युनगंड निर्माण करते व दु:खाचे कारण बनते.
ही दु:खाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
(१) वैयक्तिक
(२) सामुदायिक (अस्पृश्यतेमुळे)
(३) नैसर्गिक (पुर, भुंकप, वादळे. ई)
(३) दु:ख निरोध – हे तीसरे आर्य सत्य
हे दु:खी माणसाला आशावाद दाखविते. दुसऱ्या आर्य सत्यात जी दु:खाची कारणे सांगितली आहेत त्यामुळे दु:ख निर्माण होते म्हणुन हे परिणाम नको असतील तर त्याची कारणे नष्ट करुन दु:खाचा क्षय करता येतो , दु:ख टाळतां येते हा तर्क म्हणजे दु:ख निरोध नावाचे तिसरे आर्य सत्य भगवान बुध्दानी सागींतले आहे. हाच आशावाद होय.
(४) दु:ख निरोध गामिनी पटिपदा – चवथे आर्य सत्य
तिसऱ्या आर्य सत्यात सांगितल्या प्रमाणे आशावादी सुत्राचे व्यवहारीक प्रात्यक्षिक म्हणजे चवथे आर्य सत्य होय. दु:खाचे निरोध (दु:खमुक्त ) करण्यासाठी बुध्दानी मध्यम मार्ग सांगितला आहे. अति भौतिक सुख किंवा अति तप (त्याग) हे दोन्ही टोकांचे मार्ग न अवलंबिता मध्यम मार्गाने दु:खाचा नाश करणे होय. बुध्द म्हणतात जीवनाचे आठही अंग मध्यम मार्गाने चाला व दु:खमुक्त जीवन जगा.
हा मध्यम मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. हा मार्ग प्रज्ञा, शिल, समाधि वर आधारीत असुन ह्याचे तिन भागांत वर्गीकरण केले आहे-
प्रज्ञा –
- सम्यक दृष्टि,
- सम्यक संकल्प
शील-
- सम्यक वाचा,
- सम्यक कर्मांत
- सम्यक आजीविका
समाधि-
- सम्यक व्यायाम
- सम्यक स्मृती,
- सम्यक समाधि
निष्कर्ष :
अशाप्रकारे हे चार आर्य सत्य जीवनाला सुंदर, सुखमय व मधुर बनविण्याचा सिध्दांत होय. जीवनात दु:ख आहे ह्या सत्याचा स्वीकार करणे होय. जर हे सत्यच स्विकारणार नाही तर ते सुधारणार कसे ?दु:खाचा स्वीकार हे ते नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. दु:ख आहे हे मान्य केले नाही तर हे दु:ख कमी होणारं नाही पण मान्य केले तर ते नष्ट करण्याचा मार्ग शोधता येतो. कारण अनित्यतेचा सिध्दांत दु:ख अनंत आहे हे मान्य करीत नाही अनंत काहीच नाही. सनातन काहीच नाही. तर दु:ख ही नष्ट होऊ शकते ते आर्य अष्टांगिक मार्गाने … ते म्हणजे-
- सम्यक दृष्टि,
- सम्यक सकंल्प,
- सम्यक वाचा,
- सम्यक कर्मांत
- सम्यक आजीविका,
- सम्यक व्यायाम,
- सम्यक स्मृती ,
- सम्यक समाधी
हे होय..